वृत्तांकन: संदिप कसालकर
जोगेश्वरी : लोकमान्य गणेश विसर्जन तलाव, शाम नगर येथे निर्माण झालेल्या मोठ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता प्रतिक्रिया रंगू लागल्या आहेत. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन पार पडतं, पण यंदा भक्तीच्या मार्गावरच पोटहोल्स आणि खड्ड्यांनी भाविकांची चिंता वाढवली आहे. मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांना पाय घसरल्यामुळे अपघाताची भीती सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनंत नर यांनी आरोप केला की, परिसरात अवैध बांधकाम सुरू असून जर ते थांबले नाही तर आंदोलन केले जाईल.
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "गेल्या अनेक वर्षांपासून भक्तांना त्रास होईल असं काम झालं नाही आणि होणारही नाही. विरोधकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात आहेत. जनता नव्या सुविधांचे स्वागत करेल."
0 Comments